[500+] Motivational Quotes in Marathi | चांगले व प्रेरणादायी विचार मराठी

Motivational Quotes in Marathi

[500+] Motivational Quotes in Marathi | चांगले व प्रेरणादायी विचार मराठी

Motivational Quotes in Marathi – आम्ही येथे 500 पेक्षाही अधिक चांगले व प्रेरणादायी विचार मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. या विचारांचा आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात काही चांगले दिवस पाहायला मिळतात, तसेच कधी कधी जीवन पूर्णतः नैराश्यमय होऊन जाते. आपल्याला असं वाटते कि आता सगळे संपलय. पण यावेळी आपल्याला आपला आत्मविश्वास वाढविणारे आपल्या जवळच्या व्यक्तीची साथ हवी असते. त्याचबरोबर चांगल्या प्रेरणादायी विचारांची साथही तितकीच महत्वाची आहे.

जर आपणालाही तसाच प्रत्यय आला असेल आणि आपणही प्रेरणा देणारे मराठी विचार (Motivational Quotes in Marathi) वाचू इच्छित असाल तर आम्ही याठिकाणी जवळपास 500 पेक्षाही अधिक सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठी मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल अशी अपेक्षा…

Motivational Quotes in Marathi

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा,
की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका
तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे.

Motivational Quotes in Marathi

तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल
तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते,
तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी
तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका,
कारण आपलं ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

Motivational Quotes in Marathi Language

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा
सर्वात महत्वाचा घटक आहे.

मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय
तर अपमान गिळायला शिका.
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं
स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील.

सर्वात मोठे यश हे सर्वात
मोठ्या निराशेनंतरच मिळते.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

Success Quotes In Marathi

हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण हजारो चुका माफ करणारे
आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत.

गरज संपली की विसरणारे फार असतात,
गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.

मेहनत इतक्या शांततेने करा की,
तुमचं यशच आवाज करेल.

हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं.
मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

गेलेला काळ कधी बदलता येत नाही
पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात.

सकारात्मक विचार केला की
नकारात्मक काही उरत नाही.

जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत,
कोणाला दाखवताही येत नाहीत पण सतत ठसठसत राहतात.

स्वतःचं मन शांत करता आलं की
सगळे गोंधळ आपोआप शांत होतात.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.

यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.

नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते,
मेहनत करूनच उघडावे लागते.

Also Read This
[500+] Good Morning Quotes Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश

Success Quotes in Marathi

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे
तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

मागे आपला विषय निघाला की समजायचे
आपण पुढे चाललो आहोत.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

स्वाभिमान विकूण मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.

Positive Motivational Quotes In Marathi

यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे
जी इतरांना माहीत नाही.

कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं,
सत्यात नाही.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ.
चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते.
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे
यावर यश अवलंबून असते.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अधिक प्रबळ असायला हवी.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.

यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग
हा अगदी एकसारखाच आहे.

संधी मिळत नाही ती मिळवावी लागते.

तुम्ही जितकं कठीण काम कराल
तितकं यश तुमच्या मागेमागे येईल.

काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात
तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.

यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट
हटके मार्गाने करा.

Motivation Quotes in Marathi

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

न हरता, न थकता न थांबता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

सांभाळून चला,
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.

कर्म जेव्हा वसुलीवर येते,
त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही,
त्यामुळे आपल्या कर्माशी आणि
कार्याशी प्रामाणिक राहून
आयुष्याची वाटचाल करा.

आपला वेळ मर्यादित आहे,
तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात
वाया घालवू नका.

मोक्यावर साथ सोडणारी माणसं
बऱ्याचदा तीच असतात
ज्यांना कधीकाळी आपण
डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो.

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा
अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या.

माणसाने समोर बघायचं की मागे,
यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं.

Motivational Status In Marathi

आयुष्यात सुखी व्हायचे असेल
तर जगाचा विचार करणे सोडून द्या.

हिंमत एव्हढी ठेवा की,
तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल.

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही
तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही.
हे एकदा मनाशी पक्के केले की
आपण जिंकणार हे नक्की.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या
तरच यश मिळालं असं समजा.

Also Read This
[200+] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Positive Motivational Quotes in Marathi

न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर
नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं.

भलेही यशाची खात्री नसेल
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचे असेल तर,
चाली रचत राहाव्या लागतील.

अशा ठिकाणी कधीही जाऊ नका,
जिथे तुम्हाला बोलावलं नसेल.
अशाने तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करता आहात.

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही
तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता, फळं वाहता,
न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता
पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली,
की मात्र शंका उपस्थित करता की
हे काम मला जमेल की नाही.

Marathi Motivational Quotes in Marathi

ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं,
तिथे कधीच जायचं नाही.
कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते.
त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलवलं असतं.
अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका.

जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही
तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये.
तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल
तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्वकाही सांगेल.

जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो
तर परिस्थितीवर अवलंबून असतो.
एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होत असते,
तर दुसरी व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असते.

तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका,
की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल.
कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो.
जोपर्यंत आपण स्वतःला महत्व देत नाही,
तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्व देणार नाही.

खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

Inspirational Thoughts In Marathi

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

Inspirational Quotes In Marathi

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

न हरता, न थकता, न थांबता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरते.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.

Life Motivational Quotes In Marathi

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचंही तसंच आहे.
काही काळासाठीच दुःख राहतं,
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी.

आपली सावली निर्माण करायची असेल
तर ऊन झेलण्याची तयारी लागते.

खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत.

खरं तर सगळे कागद सारखेच.
त्याला अहंकार चिकटला की,
त्याचे सर्टिफिकेट होते.

आयुष्य फार सुंदर आहे
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे.
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात
ज्यांचे निर्धार ठाम असतात,
ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

Also Read This
[200+] Marathi Shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह | Love Shayari in Marathi

Motivation Quotes in Marathi

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

पवित्रता, धैर्य आणि उद्योग
हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत.

उठा, जागे व्हा
आणि तोपर्यंत थांबू नका
जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.

ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे,
मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो.

एक वेळी एकच काम करा
आणि ते काम करताना
त्यात आपला पूर्ण आत्माही घाला
आणि बाकी सगळं विसरून जा.

नवीन विचार तर दररोज येत असतात
पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो
आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो.

समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत…”

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”

“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते…

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात.
स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो,
ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.

जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.
कारण हा निसर्गाचा नियमच आहे.
ज्या झाडावर गोड फळ असतात
त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.

इच्छा दांडगी असली की
मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर
सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा.

“यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.”

“चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात.!”

अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप
भावूक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा..
पण कधी हिम्मत हारु नका..”

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की
जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं.

आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत,
तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही.

ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी,
की उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना असते.
माणूस जेवढा जमीनीवर राहील,
तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल.

आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही,
तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो.

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

Also Read This
[500+] Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद

प्रेरणादायी विचार मराठी

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल
तर पद्धती बदला ध्येय नाही.

यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने
आपले निर्णय बदलतात.

भाग्यसुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं.

यशांमध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा.

डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही
महान कार्य करणं शक्य नाही.

कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की,
ते काम आवडीने करा.

जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत,
ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा
कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो.

कार्य हाच यशाचा पाया आहे.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील,
तेव्हा समजून जा,
तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहात.
कारण जेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात,
तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात.

साधी माणसं नेहमी फसवली जातात
कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात.
आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही पण
जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावध व्हा.

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.

ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.

ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

लक्षात ठेवा अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे.

समोरच्याला माफ करता येतं,
त्याचे अपराध विसरता येतात
पण त्याच्यात पुन्हा गुंतून नाही राहता येत.

प्रार्थना कधीही वाया जात नाहीत
फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते.
लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं,
ते देखील गमावून बसतात.

जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका.
आधी स्वतःचे महत्त्व ओळखा
आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा.

बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की
त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं.
पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं
सदैव तुमच्या हातात आहे.

वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं
हीच यशाची पायरी आहे.

Life Motivational Quotes Marathi

या क्षणी केलेली चांगली गोष्ट
तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते.

तुमचं यश यावरून ठरवा की,
तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे.

आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं.
यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे
प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे.

जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही
तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.

गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून
प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.

एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय
ही जोडी नेहमीच विजयी ठरते.

मी हे ओळखलं आहे की,
कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं
यात साहस नसून आपल्या भीतीवर
विजय मिळवणं हे साहसी आहे.

प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी
मिळालेली नवी संधी आहे.

प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं
आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

ध्येय उंच असले की,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्वतः ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

सगळं नीट होईल कदाचित आज नाही,
पण येत्या काळात.

जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल,
तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली होती.

लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका,
दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.

जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही
तर यशही हाताळता येणार नाही.

यश ही तुमची सावली आहे
तिला पकडायचा प्रयत्न करू नका.
तुमचा मार्ग चालत राहा,
ते आपोआप तुमच्यामागे येईल.
लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते
जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.

आयुष्यात समस्या असतील तरच
तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.

जोपर्यंत जीवन आहे,
तोपर्यंत शिका.
कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

जेवढा मोठा संघर्ष,
तितका तुमचं यश शानदार असेल.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

विचार करण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थांबवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात,
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो.

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

माणसाला स्वत:चा “photo”
काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता,
एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष.
लक्ष केंद्रित करून आपण
इंद्रियावर संयम ठेऊन
आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो.

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही,
तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

Also Read This
[500+] मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles | Marathi Kodi

Motivational Status in Marathi

ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव.

लोक तुमची स्तुती करोत वा निंदा,
तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो,
तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या,
आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते
तिचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती तुम्हाला
उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा
आणि हे करूनही लोक तुमची
कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे,
तुमचा नाही.

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची,
जिथे हरण्याची भीती वाटते.

संकटावर अशा रितीने तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल
तर एकट्यानेच लढायला शिका.

पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा.
कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही
हे नेहमी लक्षात ठेवा.

आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना
कधीही दोष देत बसू नका.
उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की
जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत,
त्यांना पश्चाताप झाला पाहिजे.

मोठ्या आणि आदरणीय व्यक्ती त्याच असतात,
ज्यांना भेटल्यावर आपल्याला आपल्यातल्या कमतरता न दिसता
आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसू लागतील.

तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की
सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात,
काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं.

संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो,
पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभं असतं.
त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर
अजिबात वाईट वाटून घेऊ नका,
कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही.
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका.
कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे
त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

स्वतःचा विकास करा.
लक्षात ठेवा की,
गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.

चांगली माणसे आणि चांगली पुस्तके
लगेच लक्षात येत नाहीत.
त्यांना वाचावं लागतं.

कधी कधी चांगले घडण्यासाठी
तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.

महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे.
महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास,
कोण आपल्यासोबत आहे.

सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा.
मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील.

दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत.
यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत.

माणसाच्या आयुष्यातील संकटं ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही.
म्हणून प्रयत्न करत राहा.

कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं.
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात
आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या.

नजरेत भरणारी सर्वच असतात पण
तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो,
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा
आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला
तर नात्यांमधला आदर वाढतो.

कुणीतरी येऊन बदल घडवतील
याची वाट पाहण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

लोकं नावं ठेवतच राहणार,
पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे.

जिथे चूक नसेल तिथे माफी मागू नका आणि
जिथे तुमचा आदर केला जात नाही,
तिथे कधी पाय ठेवू नका.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.

हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही.

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही
पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय
नक्कीच आयुष्य बदलू शकतो.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपला की दुःख संपते.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

आत्मविश्वास सुविचार मराठी

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

प्रयत्न सोडू नका,
सुरूवात नेहमी कठीणच असते.

जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते,
तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो.
सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा
लाभलेला क्षण सुंदर करा.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे माशांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो,
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतः वर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की,
आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल.

काहीही असंभव नाही,
ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे
आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.

आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे,
थांबण्याचं नाही.

जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल
तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

यश मिळवण्यासाठी लढावं लागतं
आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात,
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे,
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे,
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो
स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही.”

कारण देण्यापेक्षा
झालेल्या चूका मान्य
करायला शिका.
आयुष्यात ते महत्वाचं आहे.

“विजेते” वेगळ्या गोष्टी
करत नाही ते प्रत्येक
गोष्ट “वेगळेपणाने” करतात.

इतके जिद्दी बना की तुमच्या
ध्येयापुढे तुम्हाला काहीही
दिसल नाही पाहिजे…

“संधी” आणि “सूर्योदय” दोन्हीत
एक साम्य आहे उशिरा जागे
होणाऱ्याच्या “नशिबी” दोन्ही नसतात.

“तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.”

Inspirational Thoughts in Marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.

तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.

गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.

कोणतीही चूक वाया घालवू नका
त्यातून काहीतरी शिका.

यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

Inspirational Quotes in Marathi

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

आधी विचार करा; मग कृती करा.

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय – मौन !

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले 500+ चांगले व प्रेरणादायी विचार (Motivational Quotes in Marathi) आपल्याला नक्की आवडतील. हे प्रेरणादायी विचार आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारचे अजून काही संदेश असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्यांनाही नक्कीच Add करू.

अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply