[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Marathi Suvichar

[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Marathi Suvichar – याठिकाणी आपल्याला जवळपास 1000 पेक्षा अधिक सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह वाचण्यास मिळेल. हे मराठी सुविचार वाचून आपण आपले विचार समृद्ध करू शकता.

चांगले विचार व चांगले सुविचार आपल्याला नेहमीच प्रत्येक वेळी सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्या विचारांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका अदा करतात. ज्या व्यक्तीकडे विचारांचा भक्कम पाया असतो तो व्यक्ती नेहमीच सकारात्मक राहतो व अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहण्यास इतर व्यक्तींनाही खूप आवडते.

मनुष्याच्या आयुष्यात योग्य दिशा प्रदान करण्याचे काम चांगले सुविचार (Marathi Suvichar) करतात. निराशेच्या गर्तेत गेलेल्या व्यक्तीला पुन्हा विचारांची व सकारात्मकतेची उभारी देण्याचे काम चांगले सुविचार करतात. त्यामुळेच आमचा याठिकाणी प्रयत्न असणार आहे कि, आपल्यासाठी सर्वोत्तम व आयुष्याला योग्य दिशा दाखवणारे सुविचार उपलब्ध करून देणे. हे सुविचार आपण वाचूही शकता व आपल्या प्रियजनांना शेअर करून त्यांनाही प्रेरित करू शकता.

Marathi Suvichar

नेहमी उच्च ध्येय ठेवा,

ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो.

काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

वाया घालवलेला वेळ
आपलं भविष्य बिघडवत असतं.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल,
तो हिरासुद्धा असू शकतो.

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर
म्हणजे शांत राहणे.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.

खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात,
म्हणून बोलत चला.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा,
तुमचे शौक आपोआप कमी होतील.

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.

सुंदर मराठी सुविचार

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका
कारण आज जे तुमच्याजवळ आहे
उद्या ते नसूही शकते.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

लोकं आपल्याला कॉपी करायला लागले
की
समजावं तुम्ही यशस्वी झालात.

नातं तेव्हाच तोडा
जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते
म्हणून सुख न शोधता समाधान शोधा,
आयुष्य खुप आनंदात जाईल.

इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका
आणि
कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.

अश्या लोकांना शोधा,
जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

“मी आहे ना, नको काळजी करू”
असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..

स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो.

अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ,
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

Also Read This
[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi

Anmol Suvichar in Marathi

नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते
फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते.

मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात,
तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा.
काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का?
अश्रू आणि हास्य…!
कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही,
पण ते जेव्हा दिसतात,
तो आयुष्यातला अत्यंत सूंदर क्षण असतो.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली
यावरुन तुमची खरी श्रीमंती कळते.
आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर
आणि
माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका.
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…

संघर्षाच्या वाटेवर जो चालत असतो,
तोच जगाला बदलत असतो,
ज्यांनी रात्रीवे विजय मिळवला आहे,
सूर्य म्हणून तोच चमकला आहे.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका.
फक्त एवढी काळजी घ्या की
तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका.

कुणी तरी फार छान म्हटलं आहे,
जीवनात घाबरून का जातो दुःखाने,
जीवनाची सुरुवातच होत असते रडण्याने.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

घाबरटाला सारेच अशक्य असते.

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही विसरत.

विज्ञानाचं तंत्र शिका पण,
जगण्याचा मंत्र हरवू नका.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

बिंदास हसावं दुःख काय आहे,
जीवनात कुणाला टेंशन कमी आहे.
चांगलं आणि वाईट हा फक्त एक भ्रम आहे
कारण जीवनाचं नावच कभी ख़ुशी कभी गम आहे.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल
तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

जीवन हसत-हसत जगावं,
प्रेम आणि आनंद मिळत राहावं,
नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

वेळ तुमची आहे.
हवं त्याला सोनं बनवा किंवा
स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.

जीवनात अडचणी त्यांनाच येतात
जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात
आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नसतात,
एकतर जिंकतात किंवा शिकतात.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

हसा आणि हसवत राहावं,
प्रत्येकाने आनंदात रहा,
माझी आठवण नाही काढली तरी चालेल
मात्र रोज तुमची आठवण काढणार.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

Marathi Suvichar on Life

इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल
मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच चालावं लागेल.

अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.

रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते,
कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्ह्याव
म्हणून तुम्हाला शुभ सकाळ म्हणतोय.

सकाळी-सकाळी भरावी आनंदाची जत्रा.
ना इतरांची काळजी, ना दुनियाची पर्वा.
एक रम्य, आनंदादायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

जी लोकं सरळ मनात उतरतात,
त्यांना सांभाळून ठेवा.
आणि
जी मनातून उतरतात,
त्यांच्यापासून सावध रहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

यशासाठी बनवलेले नियोजन अर्धवट सोडू नका,
त्यामधून काहीतरी चांगले मिळवाच.

तुम्हाला जर एखाद मोठा काम करायचं असेल
तर त्या कामावर मनापासून प्रेम करा
आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.

भेकड म्हणून जगण्यापेक्षा
शुराचे मरण कधीही चांगले.

अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता
यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते.

थेंब कितीही लहान असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

मरण जवळ आलं म्हणून
जगायचं कुणी थांबतं का !

आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही
तर स्वतःला घडवण्यात आहे.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं,
कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं.

माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले
की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात,
कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.

जास्त विचार करत बसलं की
कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !

आपल्या प्रतिमेची काळजी घ्या,
कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

कामात आनंद निर्माण केला की,
त्याचं ओझं वाटत नाही.

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते
आणि
ते कोठे जमिनीवर नाही तर
आपल्या मनात रुजवावे लागते.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं जरूर…

जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये,
कारण चांगले लोकं आनंद देतात
आणि वाईट लोकं अनुभव.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

अपयश मिळणं ही शोकांतिका नाही
तर यशासाठी प्रयत्नच न करणे
ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

शांत राहणे केव्हाही चांगले कारण
जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात.

कोणतंही चांगल कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.

यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं,
आपण घेतलेले कष्ट नाही.

दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे
मात्र त्यामध्ये जीवन बदलावण्याचे सामर्थ्य आहे.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात:
म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

या जगात
कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही,
तुमचं दु:ख सुद्धा.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे…
जो राजवाड्यात जेवढी चव देतो,
तेवढीच चव झोपडीत पण देतो.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

मुर्खांच्या चर्चेत शहाणपणाच्या गोष्टी करणे
म्हणजे मूर्खपणाच आहे.

सर्वात यशस्वी माणूस तोच
जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

तुमच्यावर किती लोकं विश्वास ठेवतात
किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही
तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

Positive Suvichar

प्रयत्न करणे कधीच सोडू नका,
गुच्छातील शेवटही चावीसुद्धा कुलूप उघडू शकते.

कपडे नाही
माणसाचे विचार Branded असले पाहिजे.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे
तर गुणांनी प्राप्त होते.

उठा, जागे व्हा
आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
हक्क आणि कर्तव्य
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

जीवन जगण्याचे दोन नियम.
पहिला फुलासारखं निखरावे
आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही
तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.

वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे,
वेळेची हत्या केल्यासारखं आहे.

जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही
आणि
जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही.

झाडावर प्रेम करणारा
माणूस सदैव प्रसन्नच असतो.

फक्त जिंकणाराच नाही तर कुठं हरावं
हे कळणारा सुद्धा महान असतो.

जो परिस्थितीनुसार बदलतो तोच समोर जातो.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल,
तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल.

कामाचा खूप व्याप असतानाही
आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच
खरी मैत्री.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो
फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते.

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल
तेवढे सोबती कमी होतील.

लहान तळ्यासारखे गोड रहा,
जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी,
फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.

जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो
कारण चांगले लोकं साथ देतात
तर वाईट लोकं अनुभव देतात.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

सर्वात जास्त नाती ही
फक्त गैरसमजामुळे तुटतात.

फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं
बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात.

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
पण
वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते
आणि
अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होते!

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

स्वतःला प्रकाशमान करायचे असेल
तर सतत चमकत राहिले पाहिजे.

ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

मनासारखं यश त्यांनाच मिळत,
ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांच ध्येय असतं.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात
तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.

Marathi Suvichar Status

अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं?
हे महत्त्वाचं नाही.
उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

चांगल्या विचारांनी झालेली दिवसाची सुरुवात
तुमच्या पूर्ण दिवस आनंददायी बनवते.

भीती हे आपला मृत्यू थांबवत नाही
तर जीवन थांबवते.

यशासाठी आधी दिलेली कारणे परत कधी देऊ नका.

यश मिळवणे सोपे असते,
तर प्रत्येकानेच ते मिळविले असते.

ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात
ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल.

जे कारणे देण्यात तरबेज असतात
ते क्वचितच जीवनात यशस्वी होतात.

माघार कधीच घेऊ नका
आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करा.

काही सोडायचच असेल तर
तुमच्यातील भीती सोडा, राग सोडा.

जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत
मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं.

विकास म्हणजे जुन्याला नव्यामध्ये बदलणं
आणि चांगल्याच अधिक चांगल्यात रूपांतर करणे होय.

काही व्यक्ती किंवा काही गोष्टी
तुम्हाला ध्येयापासून तात्पुरत्या दूर ठेवतीलही
पण ते ध्येय फक्त तुम्हीच मिळू शकता यावर विश्वास ठेवा.

दररोज स्वतःमध्ये छोटया-छोट्या सुधारणा करत गेल्यास,
मोठं यश लवकरच मिळते.

जीवनात शांतता हवी असेल
तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका.

दुसऱ्याच्या दुःखात दुःख
आणि सुखात सुख वाटायला हवं.

रडल्याने जर दुःख टळलं असतं
तर या जगात कुणीच दुःखी नसतं.

तू बदलली, मी बदललो,
हसण्यामागील कारणे बदलली
पण रडण्यामागील कारण अजूनही तूच आहेस.

तू नसल्याची फक्त एकच खंत आहे,
कितीही हसलं तरी डोळ्यात अश्रू हे येतातच.

कुणीतरी विचारलं प्रेम केलं होतं का कधी,
मी म्हटलं अजूनही करत आहे.

अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका
ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा.

जर तुम्हाला माहिती आहे की काय मिळवायचं आहे
तर थांबू नका.
ते मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत रहा.

अपयश मिळालं म्हणून काळजी करू नका
तर आजपर्यंत प्रयत्न न करता
गमावलेल्या संधींचा विचार करा.

लोक, आपण करत असलेल्या कामाला महत्त्व देत नसले
तरी तुम्ही करत असलेलं काम कधीच थांबू नका.

एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुल,
फळ येण्यासाठी विशिष्ट वेळची गरज असते.
यश मिळण्यासाठी वेळ तर लागेलच,
प्रयत्न करत रहा.

तुम्ही हरला नाही तर तुम्ही शिकणार नाही
आणि तुम्ही शिकला नाही तर
तुम्ही यशस्वी होणार नाही.

आपण गुलाब असो किंवा कमळ किंवा मोगरा,
एवढं मात्र नक्की की आपलं एक वेगळं महत्त्व असतंच,
तेच शोधा.

यशस्वी लोकं ते नसतात
जे कधीच अपयशी झाले नाहीत
तर ज्यांनी कधीच प्रयत्न करणे सोडले नाही,
ते असतात.

तुमचा स्वतः विश्वास नसेल तर
लोकांच्या तरी तुमच्यावर कसा विश्वास बसेल?

आधी तुमचे विचार बदला
मग तुमचे विचार तुम्हाला बदलवतील.

आयुष्यात तुम्हांला जे हवं असेल
आणि
ते मिळवण्यासाठी तुम्ही ज्या प्रमाणात प्रयत्न करत आहात
त्यानुसारच तुम्हाला यश मिळते.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा,
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

सुविचार मराठी छोटे

माणूस कितीही महत्वाकांक्षी
असला तरी
त्याला परिस्थिति समोर
झुकाव लागत.

छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

तलवार ही शौर्याची नव्हे;
भीतीची निशाणी आहे.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

जेंव्हा भविष्य धुक्यासारख अस्पष्ट दिसते,
तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.

चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा
शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

आपल्या वयापेक्षा
आपले विचार कोणत्या वयातील आहेत
हे महत्वाचे असते.

एकत्र आलं की सुरुवात होते,
सोबत राहिलं की प्रगती होते
आणि
एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.

गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल
मात्र माणसाला कोणता रंग लावावा
म्हणजे त्याचा माणूस करता येईल.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही,
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो,
परंतु मनातुन हरणारी व्यक्ती
कधीही जिंकू शकत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही
मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

आयुष्यात वेळेला महत्त्व द्या,
आणि
तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका.

कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही,
चूक तर आपल्या जीभीची आहे
जिला फक्त गोडच आवडते.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

स्तुती ऐकायची असेल तर
संकटाला हरवाव लागेलच.

काहीतरी चांगलं करण्यासाठी
वाईट परीस्थितीमधून जावंच लागते.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

तुम्ही वाघासारखे बना
म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.

उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा….?
कधी कधी वाईट विचारांचा ही करावा…

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ !

मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात.
एक शांतता आणि दुसरी Smile.

जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे,
परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.

आपण व्यस्त राहिलं की सर्व काम सोपी होतात
तर आपण आळशी असलो की सर्वकाही कठीण असते.

माणूस नेहमी प्रगतीशील असला
तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो.

स्वतःला हे नका सांगू की संकट किती मोठं आहे
तर संकटांना सांगा की तुमची मेहनत किती जास्त आहे.

खिडकी म्हणजे आकाश नसतं.

जगाला समजून घेणं
आणि स्वतःला समजून घेणं
यात खूप मोठा फरक असतो.

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

जर आज तुम्ही कमाईपेक्षा जास्त मेहनत करत असाल
तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार.

स्वप्न ज्यांचे मोठे असतात,
परीक्षा त्यांच्या खूप अवघड असतात.

भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

कविता म्हणजे भावनांचं चित्र!

परीक्षा म्हणजे
स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी.

जीभ जिंकणारा जग जिंकतो.

जिंकायची मजा तेव्हाच असते,
जेव्हा
अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.

गुलाब पाणी देणाऱ्या हातांना
त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार.

संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात.

संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा…
केवड्याला फळ येत नाही
पण त्याच्या सुगंधाने
तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

पाण्याचे थेंब फुलांना भिजवत आहेत,
वाऱ्याची थंड झूळूक मनाला मोहून टाकत आहे,
तुम्ही पण या, एक सुंदर सकाळ तुम्हाला जागी करत आहे.

स्वप्ने सत्यात आणायची असतील
तर आधी झोपेतून उठाव लागेल.
उठा मग.

परिस्थिती आहे तशी स्वीकारा
मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करा.

तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.

बरेच लोकांना जे हवे ते मिळत नाही
कारण त्यांना नेमकं काय हवं आहे
हेच त्यांना माहिती नसते.

जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
ते जीवनात काहीच करू शकत नाही.

शालेय सुविचार मराठी

माझं भविष्य ही माझ्या वर्तमानापेक्षा चांगल असेल
कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःला त्याच्या बंधनात बांधा तरच ती पूर्ण होतील.

जेव्हा तुम्ही म्हणाल ‘मी हे करू शकतो’
आणि
‘हे मी नाही करू शकत’
तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल.

एखादं यश न मिळाल्यास बहुधा झोप लागत नाही
तर उठा आणि काहीतरी करा.

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

तुम्ही करत असलेल्या कामात
जर तुम्हाला आनंद मिळत नसेल
तर यश कधीच मिळणार नाही.

तुम्ही केलेल्या चूका फक्त तुम्हीच सुधारू शकता.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

अपयशाची कारणे असतात
तर यशाचे किस्से असतात.
तुम्हांला काय सांगायला आवडेल?

किती उंच उडू शकतो
हे पंख ठरवतात
तर कुठपर्यंत उंच उडायचे आहे
आपलं मन ठरवत असतो.

जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत
नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा
तुमच्या कामाची पद्धत बदला,
कारण झाडे नेहमी आपली पान
बदलतात मूळ नाही…

जे नजरेतून उतरलेत,
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.

मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात
हा प्राथेनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी
मनुष्य अधिक शोभून दिसतो.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे,
त्याविषयी कमी बोला,
आणि
ज्या विषयाची माहिती नाही, त्या विषयी मौन पाळा.

आनंद तुमच्या शहाणपणावर अवलंबून असतो
तर तुमच्याजवळ काय आहे यावर नाही.

सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

जीवनात अडचणी दररोज नव्या येतात,
जिंकतात तेच ज्यांचे विचार
आणि कृती मोठ्या असतात.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे,
लोक काय म्हणतील?

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने
त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि
तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.

नवीन विश्वासासोबत,
उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधासोबत तुमचा दिवस सुरु व्हावा
एका चांगल्या हसऱ्या चेहऱ्यासोबत.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा,
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं…

आपल्या ज्ञानावर आवश्यकतेपेक्षा जास्त
विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे.

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे.
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी
अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

Marathi Suvichar Sangrah

चुका, अपयश आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो.

परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.

जिंकणे निश्चित असेल तर कायर सुद्धा लढू शकतात.
बहादूर तर ते असतात जे
हार समोर दिसत असतानासुद्धा मैदान सोडत नसतात.

सकाळी उठल्यावर सर्वांजवळ दोन पर्याय असतात.
(एक) उठा आणि आपले स्वप्न पूर्ण करा.
(दोन) झोपत रहा आणि स्वप्न बघत रहा.

कुठलीही अशक्य गोष्ट
ती मिळेपर्यंतच कठीण असते.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

आनंद हा आपण कोण आहोत?
आणि आपल्याकडे काय आहे?
यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार
तो आपल्याला हळूहळू कळत असतो.

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

आयुष्यात कितीही दुःख असू द्या,
ते किती कठीण असू द्या,
कधी हार मानू नका
या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही,
दुःखही हळूहळू कमी होईल.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.

तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका,
कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही.

तुम्ही कोण आहात
यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे
महत्वाचं आहे.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

वाईट निर्णयामुळे अनुभव येतात
आणि अनुभवामुळे चांगले निर्णय घेता येतात.

आनंदी राहण्याचे कारण लवकर शोधा,
नाहीतर जीवन दुःखाच्या संधी लवकर तयार करते.

एखादं स्वप्नं खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पूर्ण नाही झालं
तेव्हा दुसरं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी
जेव्हा माणूस पुन्हा पाय रोवून उभा राहतो
त्याला जीवन म्हणतात.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ…
कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

राजाला फक्त राज्य मानते,
तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.

आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

काही लोक हे
आगीसारखे असतात…
विनाकारण जळत राहतात.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

तुमच्या उपस्थितीची जाणीव
आणि अनुपस्थितीची उणीव
भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.

विद्या विनयेन शोभते ॥

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच
असेल असं होत नाही, त्यासाठी मन
सुंदर असावं लागतं.

हात उगारण्यासाठी नसतात;
उभारण्यासाठी असतात.

आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत,
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

स्वतःची चूक स्वतःला
कळली की बरेच प्रश्न सुटतात.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

जीवन जगण्याची कला
ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.

योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ
नेहमीच योग्य असते.

सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

आपला एक RULE आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.
प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

जीवन खूप अडचणीत व्यस्त आहे,
तरी पण ते मस्त आहे.

अयशस्वी होतात ते सर्व प्रयत्न,
जे मनापासून केल्या जात नाहीत.

जगात तेच लोकं काहीतरी विशेष करतात,
ज्यांना लोकं म्हणतात तू काहीच करू शकत नाही.

तुमच्या ध्येयावरून
जग तुम्हाला ओळखत
असत.

Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

चांगले सुविचार

“मी”पणा आला कि
कमीपणा घ्यायला कोणी
तयार होत नाही.

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.

कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

माझे तर डोळे पण त्यानेच उघडले,
ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता.

विज्ञानाचं तंत्र शिका
पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

मूर्खांना विवेक सांगणे हाही मूर्खपणाच !

उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.

शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते,
पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही.

धैर्यहीन मनुष्य
तेलहीन दिव्यासारखा असतो.

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,
फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे
स्वतः ला ओळखणे.

नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही,
ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या…
मग
आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

स्वतःला कमजोर समजणे
हि मोठी चूक आहे.

प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा
ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

जर हरायचीच भीती वाटत असेल
तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या.

कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही
मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो.

सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.

जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात,
ज्यांना यशस्वी व्हायचे असेल,
ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.
भविष्याचा अंदाज घेण्याचा
उत्तम मार्ग म्हणजे
तो तयार करणे.

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही,
त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.

ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे
त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.

आपण जोवर काही करत नाही
तोवर सर्व अशक्य दिसते.

वैराने वैर वाढेल,
परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून
आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत,
तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.

स्वतःची वाट स्वताच बनवा,
कारण
इथे लोक वाट दाखवायला नाही तर
वाट लावायला बसलेत.

आयुष्यात काही शिकायचे असेल
तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले
तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

सरावानेच अचूकता निर्माण करता येते.

गरज ही शोधाची जननी आहे.

जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

जिथं आपली कदर नाही,
तिथं कधीही जायचं नाही.

जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते.
कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून.

अंथरूण बघून पाय पसरावेत.

त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं
जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही.

काही गोष्टी ह्या फक्त प्रयत्न करून मिळत नाही
तर वेळेनुसार आपसूकच मिळतात.

आपली बाग सजवताना दुसऱ्यांची
फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.

माझ्या चुकीच्या गोष्टी मला सांगा
कारण त्या मला सुधारायच्या आहेत इतरांना नाही.

जीवन हे मोबाईल मधील गेम सारखं झालं आहे
एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते.

100 मराठी सुविचार

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

न्यायाची मागणी करणाऱ्याने
स्वतः न्यायी असले पाहिजे.

कुणाला आपलंस करायच असेल तर
वरवरुन करण्यापेक्षा
हृदयाने आपलंस करावं…
आणि
कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
हृदयापासुन रागवण्यापेक्षा
वरवरुन रागवत राहावं.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.

जर पळून पळून थकला असेल
तर चालत राहा.
पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष्य गाठाल.

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल.
मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल.

दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते
जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सॊडतो.

दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या,
की मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा
घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळू शकतो.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही,
आणि
यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

थोडे दुःख सहन करुन,
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

संकटं तुमच्यातली
शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

जे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात
व ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात
त्यांचे जीवन यश मिळेपर्यंत कधीच सोपं नसतं.

तुझ्या बोलण्यावरून एवढं तरी समजलं की,
तू आता कुणा दुसऱ्याची भाषा बोलत आहेस.

भावनेने मनाला जिंकता येते,
प्रेमाने रागाला जिंकता येते,
आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते,
धीराने अपयशाला जिंकता येते
तर माणुसकीने माणसाला जिंकता येते.

बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते…

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका .
शहाणपणाने काम करा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही,
तो जगावर काय प्रेम करणार !

आधी विचार करा;
मग कृती करा.

जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो
त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.

अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
तर वाईट माणसे बिघडतात.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे,
जे तुम्ही मिळू शकत नाही, असं लोकं म्हणतात.

ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता
आणि
संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.

मोठी स्वप्ने पाहणारेच,
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

स्वतः कमावलेल्या पैश्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात
शौक नाही.

जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.

गुलाबाला काटे असतात असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उतम !

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.

क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते…
धोका देणाऱ्याला नाही…
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.

कर्तव्याची दोरी नसली की,
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

जगी सर्व सुखी असा कोन आहे;
विचारी मना तुच शोधूनी पाहे.

स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

पिंजऱ्यात कोंडून पाखरं
कधीच आपली होत नाहीत.

जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात
आणि त्यावर कृती सुद्धा करतात.

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच मरतात.

कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.

मी अजून मला हवं ते मिळवलं नाही
पण कालच्यापेक्षा ‘आज’ थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे.

जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले
तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.

आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी
त्या वेळी माघार घेतलेली असते,
ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात.

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात
तेंव्हा समजून घ्यावं की,
तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

कधीच कुणाला बेकाम समजू नये
कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून
दोन वेळा बरोबर वेळ दाखवते.

अनेकवेळा आलेले अपयश
हे एका यशाने संपून जाते.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जिथे तुमची हिम्मत संपते,
तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.
कडू घोट प्रेमळ
माणसाच्या हातून दिल्यास
तो कमी कडू लागतो.

कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.

संयम म्हणजे काय?
एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !

आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला
अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून
नेहमी नवे विचार मिळवत रहा.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही
तर ते जातात आणि शिकार करतात.

तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही
तर संपेल तेव्हा,
जेव्हा तुम्ही माघार घ्याल.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

स्वतःला ओळखणे म्हणजे
स्वतःला स्वतःमधील माहित नसलेले सामर्थ्य माहिती होणं.

कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा.
कधी कधी उद्याचा अर्थ ‘केव्हाच नाही’ असा पण होतो.

Marathi Suvichar New

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल
तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा
आणि
जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही
तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा.

यशस्वी लोक काम करत राहतात
ते चूकाही करतात
पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात
त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात.

पुस्तकामधील धड्यापेक्षा
आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो
ही जाणीव फार भयप्रद आहे.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

दुसऱ्यांना अडचणीत आणून
तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

या जगात सर्वात सोपी
आणि
निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला
अपयशाची भीती वाटेल
पण घाबरू नका तुम्ही जिंकाल किंवा शिकाल.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा
तुमची ध्येय कधीच कमी असायला नको.

हरीणच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही
म्हणून हरीण सदैव सतर्क असते.

तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा.
तुमच्या जवळ जे असेल त्याचा वापर करा
आणि ते करा जे तुम्हाला जमतं.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

आपण किती समोर आलो आहोत
फक्त यासाठीच मागे वळून पहा.

संकटांना घाबरून मागे फिरायचे
की धैर्याने त्यांना सामोरे जायचे?
निर्णय तुमचा आहे.

साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात
ते फक्त हाच विचार करतात
की
समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

जे तुमचे क्षमतांवर टीका करतात.
ते चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करा.

अयशस्वी झाल्यानंतर एखादच स्वप्न अपूर्ण राहते.
मात्र मनात येणाऱ्या शंका
तुमची खूप सारी स्वप्न कायमची नष्ट करतात.

यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा.
ते न मिळवण्यासाठी कारणे नाही.

सर्वात चांगला नजारा एखादे
शिखर चढल्यानंतरच दिसतो.

सकाळच्या शुद्ध हवेसोबत,
सूर्याच्या कोवळ्या किरणासोबत,
फुलांच्या मधुर सुगंधेसोबत सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

फुलासारखे उमलत रहा,
सूर्या सारखे चमकत रहा
आणि दिवसभर आनंदी रहा.

गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.

सकाळ त्यांच्यासाठी नसते,
ज्यांनी अपयशामुळे जीवनात प्रयत्न करणे सोडले आहे.
सूर्याची किरणे तर त्याच्यासाठी आहेत,
जो अपयशी होऊन सुद्धा पुन्हा लढायला तयार आहे.

सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही,
मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असते.

एका क्षणासाठी का होई ना,
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणून बघा,
मनाला काहीतरी कमावल्या सारखं वाटेल.

गैरसमज कधीही मनात ठेवू नये.
त्याचे निराकरण करावे.

रात्र संपली,
पुन्हा आनंददायी सकाळ आली,
मनाला पुन्हा तुमची आठवण आली.

जर कालचा दिवस चांगला होता तर थांबू नका,
होऊ शकते तुमच्या यशाची ही सुरुवात असेल.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

स्वप्नातील जगातून आता बाहेर या,
सकाळ झाली आहे आता जागे व्हा,
चंद्र-ताऱ्याना सोडून परत या
आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.

रात्र येते तारे घेऊन,
झोप येते स्वप्न घेऊन.
ईच्छा आहे माझी आज सकाळ तुमच्यासाठी येवो आनंद घेऊन.

रात्र सकाळची वाट पाहत नाही,
सुगंध हवामानाची वाट पाहत नाही.
जे मिळेल त्याचा आनंद घ्या,
कारण जीवन वेळेची वाट पाहत नाही.

आत्मविश्वास सुविचार मराठी

पापी माणसाला पाप
कधीही शांतपणे झोपू देत नाही.

प्रत्येक नवीन सकाळ
आपल्यासाठी नवीन संधी आणि विचार घेऊन येते.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे
जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही
तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत
यामुळे काही फरक पडत नाही.

संधी मिळत नसतात
तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात.

तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा,
ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा.
मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका.

आपल्याला त्याच गोष्टी मिळतात,
ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो.
म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत,
त्यावरच लक्ष केंद्रित करा.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.

तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात
विनाकारण कुणाशी तुलना करत बसू नका.

तुमच्याजवळ नसलेलं,
तुम्हाला मिळवायचं असेल तर
त्यासाठी असे प्रयत्न करा
जे तुम्ही याआधी कधीच केलेले नसतील.

जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाहीत
तोपर्यंत ते कुणालाच सांगू नका.

मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे.

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

कोण जाणे यमाचा निरोप कधी येईल,
मी मात्र याच विचारात असतो की
कधी तुमचा मॅसेज येणार आहे.

कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

सकाळी उठल्यापासून चेहऱ्यावर आनंद हवा,
प्रत्येक दुःखापासून तुमच्यापासून दूर असावं,
सुगंधित व्ह्याव तुमचं आयुष्य असा तुमचा दिवस असो.

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.

दुःखाच रूपांतर सुखात करून बघा,
एका ठिकाणी थांबल्यापेक्षा हळूहळू का होईना चालत रहा.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

चमच्यांपासून कायम सावध रहा!

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;
तो स्वतःहून शिकतो.

माफी मागून लहान व्हा,
पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नका!

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.

मोठ्या लोकांचा मत्सर करु नका;
कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.

मन मोकळे असणे कधीही चांगले.
परंतू जीभ कधी मोकळी सोडू नका.

अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

शाळेत मैत्री करा पण मैत्रीत
शाळा करू नका.

तुमच्या यशाची उंची
ही तुमच्या प्रामाणिकपणा
आणि मेहनतीवर अवलंबून असते.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

मराठी सुविचार संग्रह
लोक वाईट नसतात…
फक्त ती तुम्हाला हवं तसं
वागत नसतात म्हणून
तुम्हाला वाईट वाटतात…

काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

ध्येयप्राप्तीसाठी अशी लढाई लढा,
कि
तुम्ही हरला तरी
जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

न हरता, न थकता न थांबता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

तुमचं प्रत्येक यश हे
तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

जुन्या किल्ल्यांनी नवीन कुलूप उघडत नाही.
बदल स्वीकारा त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा.

आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

संधीच एक दार बंद झालं तर दुसरं उघडतं,
फक्त ते शोधा…

Marathi Suvichar Short

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

तुमचं सर्वात मोठे यश,
हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या
अगदी पलीकडे असू शकते.

थांबू नका वेळ कधी बदलेल,
काहीच सांगता येत नाही.

नियोजनाशिवाय एखाद ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते.

आपण एवढं समजदार तर असायलाच हवं
की
कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवत आहेत हे कळावं.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

सर्व जग बदलण्याचा विचार करतील
तर स्वतःला कोण बदलणार?

मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी
तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवा.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते
ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.

माणसाचा सगळ्यात मोठा
सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

जग भित्र्याला घाबरवते
आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.

शांततेच्या काळात जास्त घाम गाळला
तर
युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.

खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.

जितका मोठा संघर्ष असतो,
तितकेच मोठे यश मिळत असते.

मी झुकतो कारण मला नाती
निभवायला आवडतात…
नायतर चुकीचा मी
कालही नव्हतो आणि आजही नाहीये…

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

जोड़ीदार सुंदर नाही,
काळजी करणारा पाहिजे…

तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील
फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत आहे.

ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.

तुम्हाला जे हवं आहे
ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो.
फक्त तुम्ही.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

प्रश्न फक्त संस्कार आणि आदर या
दोन गोष्टींचा आहे नायतर जो माणूस
ऐकून घेऊ शकतो तो चार गोष्टी
ऐकवू पण शकतो…

स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

काम करणे हे जर अटळ आहे तर
ते काम हसत हसत का करू नये?

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर
प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;
आहे तो परिणाम स्वीकारा.

स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग
म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.

Also Read This
[100+] प्रेरणादायक सुविचार जो आपकी जिंदगी बदल दे | Motivational Quotes in Hindi

Marathi Suvichar on Life

जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता.
तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

क्रोध माणसाला पशू बनवतो.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,
तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

कमजोर लोकं बदला घेतात,
शक्तिशाली लोकं माफ करतात तर
बुद्धिमान लोकं दुर्लक्ष करतात.

बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत
सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

एकाच विनोदावर आपण परत हसत नाही
तर एकाच दुःखावर तरी परत परत का रडायच.

बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा
आणि
तुम्हाला हवं असेल ते सध्या करा.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा
किंवा आहात तसेच रहा.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

स्वप्न बघून चालत नाही
तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे.

अपयश मिळेल म्हणून घाबरू नका
प्रयत्नांवर विश्वास ठेवा.

येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका
तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या.

आपण तेव्हाच हरणार जेव्हा
आपण प्रयत्न करणे सोडणार.

यशस्वी लोक जन्माला येत नसतात,
तर ते स्वतःला यशस्वी बनवतात.

एक दिवस मी नक्की म्हणेल,
मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे.

स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.

कोणतेही काम मनापासून करा
किंवा करूच नका.

जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत,
तोपर्यंत काही संपत नाही.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो
जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय ?
हे विचारणार सुद्धा कोणी नसत…

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;
तो स्वतःहून शिकतो.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

आताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते
तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते.

एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी
एकदा हा विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं?

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

चुका होणं हा तुम्ही
ते काम करताय याचा पुरावा आहे.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

छोटी विचार करू नका
तुमच्या मनाला पटवून द्या की
तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

थोडी वाट पाहायची असती तू,
वेळ वाईट होती माझी, मी नव्हतो.

काही नाती खूपच वेगळी असतात,
जोडता पण येत नाही आणि तोडता पण येत नाही.

फक्त कपडेच नाही
तर विचार पण ब्रँडेडच ठेवा.

नुसती चष्मे लावून दृष्टी नका बदलू
तर दृष्टिकोन पण बदला.

समजावून सांगतांना
थोडीफार साथ पण द्या.

पाहून न पाहिल्यासारखं कुणी करत असेल
तर शांत राहून त्याच्या आयुष्यातून दूर जा.

जेवढी मोठी स्वप्ने असतात,
परीक्षा पण तेवढ्याच कठीण असतात.

तुम्ही ठरवाल तेवढ्याच मर्यादा तुम्हाला आहेत.

कधी चालले नसाल तर चाला,
चालले असाल तर पळा,
फक्त एका ठिकाणी उभे राहू नका.

चांगल्या चालकांची तपासणी ही खड्ड्यांच्या,
वळणाच्या आणि घाटाच्या रस्त्यावरच होते.

चुकीचेही आभार माना,
कारण तीच आपल्याला शिकवते.

मोठे होण्यासाठी स्वतः जबाबदारी असून खूप गरजेचे आहे.

जे सुरू केलंय त्याला पूर्ण करा अर्ध्यावर सोडू नका.

प्रत्येक दिवशी तुमच्या शिकण्यात,
ज्ञानात,
आणि मेहनतीत सुधारणा व्हायला हवी तरच यश मिळेल.

तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न टिकून राहिले
तर ते तुम्हाला हवं ते मिळवून देईल.

बऱ्याच वेळा यशआधी,
स्पष्टपणे अपयश आणि निराशा येते.

काहीतरी सोपं मिळवण्यापेक्षा थोडंसं चांगलं मिळवा.

उन्हात उभं राहिल्याशिवाय तर सावली सुद्धा दिसत नाही.
मग मेहनतीशिवाय यश तरी कसं मिळणार.

आलेल्या अडचणी पासून दूर पळत असाल
तर तुम्ही कितीही वेगाने पळा,
तुम्ही कधीच जिंकणार नाही.

जीवन हे चालणारऱ्या सायकल सारखं आहे.
व्यवस्थित बॅलन्स ठेवा
आणि प्रवासाचा आनंद घेत रहा.

यश आपल्याला शोधत येत नसते
तर त्याला आपल्या प्रयत्नांनी खेचून आणावे लागते.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते
त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

Marathi Suvichar Quotes

या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…

न मागता देतो तोच खरा दानी.

वेळ बदलायला, वेळ लागत नाही…

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल
आणि
प्राणाशिवाय शरीर !

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि
कबूल केला की नाहीसा होतो.

कोणतही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थाबा.
त्याच्या परिप्णामाबद्दल विचार करा.
त्या नंतर सुरुवात करा.
सुविचार ही
माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

संशय अन लोभात गुंतलेलं प्रेम नसते.
मीराच्या प्रेमासारखं ते निस्वार्थ असते.

खूप त्रास होते त्या शिक्षेचा,
जी गुन्हा न करताही मिळालेली असते.

माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!

तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.

सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

जगाला ना प्रेम समजत,
ना मैत्री समजते.
जगाला फक्त स्वार्थ समजते.

भाग्य आणि इतरांना उगाचच दोष देऊ नये,
जे स्वप्न आपलं असेल तर
त्यासाठी लागणारी मेहनत आपली स्वतःचीच असावी.

स्वतःला कधीच वाईट समजू नये,
कारण त्याचा ठेका लोकांना घेतलेला असतो.

कुठलाही माणूस जन्मापासून वाईट नसतो,
त्याची परिस्थिती आणि जबाबदारी त्याला वाईट बनवत असते.

सोबत त्यांची असावी
ज्यांना आपण यशस्वी व्हावं असं मनापासून वाटतं.

जे परिश्रम तुम्ही आज करत असाल,
त्यानुसारच तुमचं भविष्य असेल.

माणसाकडून बोलले जाणारे शब्दच
त्याला त्याच्या उन्नतीकडे नेतात.

इतरांविषयी तेच बोलावं
जे तुम्ही स्वतःसाठी ऐकू शकता.

जीवनात शांतता हवी असेल
तर इतरांच्या निरर्थक बोलण्याला महत्व देऊ नका.

यश मिळवायचं असेल तर आपले कान बंद ठेवा
आणि
आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित करा.

यशाकडे जाणारे रस्ते कधीच सरळ नसतात
मात्र यश मिळाल्यावर सर्व रस्ते सरळ होतात.

महान गोष्टी ह्या ताकदीने नाही
तर सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने पूर्ण होतात.

चुकाकडूनही तेव्हाच शिकाल
जेव्हा त्यांचा स्विकार कराल.

‘मी सर्वोत्तम आहे’
हे बोलायचे नसते तर सिद्ध करावं लागते.

परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही
पक्ष्यांनाही अन्न घरट्यात मिळत नाही.

व्यस्त असणं महत्वाचे नसते
तर कश्यामध्ये व्यस्त आहे हे जास्त महत्वाचे असते.

गेलेला दिवस नाही बदलू शकत
मात्र येणारा दिवस नक्की बदलू शकतो.

प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरुन
प्रयत्न करणारेच यशस्वी होतात.

जेव्हा एखाद्याला यश मिळते,
तेव्हा आनंदच होतो असं नाही,
कुणाला तर पराकोटिच दुःख पण होतं.

जबाबदारी सुद्धा एक परीक्षाच असते,
जो जबाबदारी स्वीकारते,
त्यालाच ती जास्त त्रास देते.

जगात कधी काहीच संपणार नाही.
सुरुवात करणं हेच चांगल.

माहीत नाही कसं प्रेम करतो आहे,
जी माझी कधी होणारच नाही,
मी तीचा होऊन बसलो आहे.

जी आपली काळजी करतात,
तेच आपल्यावर खरं प्रेम करत असतात.

राग येणारे लोकं खूप हुशार असतात,
ते राग नेहमी आपल्यापेक्षा लहानांवरच काढतात.

रडल्याशिवाय तर कांदा सुद्धा कापता येत नाही,
ही तर जिंदगी आहे सहज थोडी कापता येईल.

खऱ्या जीवनाची सुरुवात
तुम्ही स्वतःसाठी बांधलेल्या भिंतीना तोडूनच होते.

आपण चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा,
दुसरे वाईट आहेत हे दाखवत बसू नका.

Marathi Suvichar Students

सरळ सोपं आहे,
ज्यागोष्टीत मन लागत नाही ते काम करूच नाही.

पाप ही अशी गोष्ट आहे
जी लपवली की वाढत जाते.

यश मिळाल्यावर सर्वच येतील
फक्त अपयश आल्यावर स्वतःलाच सांभाळाव लागेल.

ध्येय ठरवणे ही पहिली पायरी
तर
ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे ही दुसरी पायरी.

संधी आता दार ठोठावत नाही
तर तुम्ही दार तोडून केव्हा बाहेर येता
याची वाट बघत असते.

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.

यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही तर
आपल्या ईच्छावर विजय मिळवतो.

कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी
फक्त 1% प्रेरणेची
आणि
99% मेहनत करण्याची गरज असते.

हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून
नाराज होऊ नका
कारण जगात एखाद्यालाच सर्व काही कधीच मिळत नसतं.

सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचे नाही
मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करण्याची गरज असतेच.

कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंतच अशक्य असते.

तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी.
ते नाही मिळणार म्हणून त्याची भीती वाटायला नको.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.

क्वचितच असं होतं की मिळवलेले
यश हे अपयश न येता मिळालेलं असतं.

स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्या जवळ काय नाही आहे.
तर हा विचारांची माझ्याजवळ काय आहे.

माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते.
आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा
आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा.

विचार असे मांडा कि,
तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

एकदा तुटलेलं पान झाडाला
परत कधीच जोडता येत नाही.

न मागता देतो तोच खरा दानी.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य
तलवार असेतोवरच टिकतं.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

जगण्यात दोन बाजू असतात,
सुख आणि दुःख त्या मधील
आपण कुठली पाहतो हे महत्त्वाचे असते.

यशाकडे जाणाऱ्या जिन्याकडे न पाहता
येणाऱ्या प्रत्येक पायरीवर लक्ष केंद्रित करा.

सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!

येणारं प्रत्येक संकट,
अपयश तुम्हाला यशाकडे जाण्यासाठी प्रेरणा देते
फक्त तुम्ही खचून न जाता त्याचा आधार घ्या.

तुमच्यात असणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला संधी मिळतील असं नाही
तर संधी नुसार स्वतःमध्ये गुण अवगत करायला शिका.

Marathi Suvichar SMS

निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.

तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी साठी उभे राहता
जेव्हा सर्व संपलेलं असते
तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.

हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो
जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता.

माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.

जोपर्यंत तुम्ही अपयशी पचवू शकत नाही
तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही.

कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत
म्हणून तक्रार करत नाही
तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.

एखाद्या व्यक्तीची ईच्छाशक्ती, दृढनिश्चय
आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला
आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात.

कृतीपेक्षा वृत्ती महत्त्वाची असते.

आपण आज,
आत्ता काय करत आहे
यावरून आपले भविष्य ठरत असते.

आयुष्य प्रकाशित करण्यासाठी
अंधाराचा सामना करावाच लागतो.

माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही,
की मी कधी हरलोच नाही
तर हरल्यानंतर मी पुन्हा उभा राहिलो आहे.

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

मनापासून एखादी गोष्ट न केल्यास
ती कधीच मिळत नाही.

अपराध्याला पुन्हाः पुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

प्रत्येक रस्ता अवघड नसावा,
त्यावर आनंदाचा वर्षाव असावा,
प्रत्येक दिवस खास असावा अन दिवसासारखं जीवनही खास असावं.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो
अन इतरांवर ठेवला तर कमजोरी बनते.

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.

हा फक्त एक दिवस नाही तर
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे.

फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.

स्वतःमध्ये काही करून दाखवण्याची हिम्मत असेल
तर स्वतःवर विश्वास ठेवा,
इतरांवर ठेवलेला विश्वास कधीही तुटू शकतो.

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

जीवनात हवं ते मिळवा
मात्र एवढं जरूर लक्षात ठेवा
की तुमच्या यशाचा रस्ता हा कुणाच्या मनाला तोडून जाणारा नको.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

असो कोण आहे ज्याच्या काहीच कमी नाही आहे,
आभाळाजवळ सुद्धा कजमीन नाही आहे.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.

मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

दुसऱ्याला सावली देण्यासाठी
झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं,
की भावनांना विसरायचंच असतं.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.

सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चांगले.

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो
तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो.
आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा
प्रामाणिक प्रयत्न करतो
तो स्वतः कधीच संपत नाही.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

जर हरण्याची भीती वाटत असेल तर
जिंकण्याची ईच्छा पण बाळगू नये.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.

जे लोकं तुम्हाला जवळून ओळखत नाही
त्यांच्या मतांना तुमच्या मनाच्या जवळ नका जाऊ देऊ.

संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.
तालाची एक मात्रा चुकली तरी
त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं
स्वत:लाही आणि इतरांनाही !

पागल आणि हुशार यांच्यात एकच फरक आहे
हुशारांना काही मर्यादा असतात
तर पागल लोकांना कुठलीच मर्यादा नसते.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

इतरांविषयी तेच बोला
जे स्वतःविषयी ऐकू शकता.

ज्यांना तुमची किंमत नसते
त्यांच्यासोबत राहिल्यापेक्षा एकटं राहणे कधीही चांगले.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा आत्ताच !

तारीफ करणाऱ्यापेक्षा
टीका करणाऱ्यावर जास्त लक्ष द्या

चूक ती असते
जिच्याकडून तुम्ही काहीच शिकत नाही.

प्रयत्न करून चुकलात
तरी चालेल पण
प्रयत्न करण्यास
चुकू नये…

लहानांना मोठं करण्यासाठी
मोठ्यांना लहान व्हावं लागतं.

नेहमी उच्च ध्येय ठेवा,

ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही,
याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे
मौन.

आधी विचार करा; मग कृती करा.

आयुष्यात जर यशस्वी व्ह्यायचं असेल
तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या.

आयुष्याचा हाच उद्देश आहे की
आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
ज्ञान तुमचेच रक्षण करते.

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

जीभ जिंकणारा जग जिंकतो.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.
समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका.

आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

आपण फक्त आनंदात रहावे,
कारण
आपल्याला दुःख देण्यासाठी
अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.

काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते,
कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

मैत्री हि वर्तुळासारखी असते,
ज्याला कधीच शेवट नसतो.

हुशारी तर सर्वांकडे असते,
कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते.

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

जीवनात शांती हवी असेल तर
लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा.

आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा.
स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर
तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली असं वाटेल.

अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.

सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल
मात्र अश्या बऱ्याच गोष्टी आहेत
ज्यात तुम्ही तरबेज असाल त्या शोधा.

दुर्बल मनाचा मनुष्य
कधीच महात्मा होऊ शकत नाही.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

सत्याने मिळतं तेच टिकतं.

कृतीपेक्षा वृत्ती महत्त्वाची असते.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे;
त्याचा अनादर करू नका.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे.
तो जसा विचार करतो तसा बनतो.

Marathi Suvichar Small/Chhote

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.

प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे,
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा धरू नका.

काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.

मनुष्याची आर्थिक स्थिती
कितीही चांगली असली
तरीही
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.

स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा,
जे गटारीत पडले तरी
त्याचे मोल कमी होत नाही.
परीक्षा म्हणजे
स्वतः च्या आत
डोकावून पाहण्याची संधी.

आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो,
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका,
स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात,
तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.

मोठी स्वप्ने पाहणारीच
मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.

एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो.

मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
असतात
ते कधीही एकटे नसतात…

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

लोकं असं जरूर म्हणतात की
तुम्ही चांगलं करा
मात्र हे कधीच म्हणत नाही की
माझ्या पेक्षा चांगलं करा.

विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न
अपयशाला घाबरत नाहीत.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा
आणि
इतरांना गंध द्या.

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

आयुष्य जगून समजते;
केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही.
गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.

आशा ही उत्साहाची जननी आहे.

दुःखी व्हा
किंवा स्वतःला प्रेरित करा
कारण तुमचे ध्येय तुम्हीच निवडलेल आहे.

तक्रारी आता तुझ्यासोबत नाही,
स्वतःसोबत आहेत.
खोटं तू बोललीस
मात्र त्यावर विश्वास तर मी ठेवला होता.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

अंधार असणं अडचण नाही तर
आपल्याला दिवा लावायला वेळ नाही
किंवा तसं सुचत नाही.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.

एवढं आनंदी रहा की दुःख आलं
तर त्याने म्हणायला हवं ‘इथं कशाला आलो’

खरच जीवनात जर काही मिळावयाचं असेल
आणि मिळत नसेल तर
ते मिळवण्यासाठीचे तुमचे रस्ते बदलत रहा
ध्येय नाही.

मोठा माणूस तो असतो,
ज्याला भेटल्यावर स्वतःला कुणी लहान समजत नाही.

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत रहा
कारणं माणूस मोठ्या संकटापेक्षा छोट्या समस्यांनी जास्त त्रस्त असतो.

भविष्याची जास्त चिंता करू नका,
इथं मरणार सगळेच आहेत.

मित्रांमध्ये श्रीमंती नका पाहू,
काळजी घेणारे मित्र नेहमी गरीबच असतात.

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

शत्रू बनवण्यासाठी आता भांडण करणे गरजेचे नाही.
तुम्ही फक्त यशस्वी व्हा, ते आपोआपच तयार होतील.

यश एका दिवसात नाही मिळत
पण मनापासून प्रामाणिक करत राहिलात,
तर एक दिवस नक्की मिळते.

त्यांच्यासाठी एक वेळ हरलं तरी चालेल
ज्यांना दुसऱ्यासाठी जिंकायचं असते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि
स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

इतिहास घोकण्यापेक्षा
इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

बरेच लोक त्यांचे स्वप्नाप्रमाणे जगत सुद्धा नाहीत
फक्त त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

विनाकारण काळजी करणे म्हणजे
आपण कधीही न घेतलेल्या
कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे.

जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नाही,
तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

Marathi Suvichar for Whatsapp

आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.

नेहमीच तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

कधीच हिम्मत हरू नका,
जीवनात संपण्यासारखं असं काहीच नाही.
प्रत्येक नवा दिवस हा तुमचा वाट पाहत असतो.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

प्रत्येक सकाळी आपण त्यांचीच आठवण काढतो,
जे आपल्या मनात असतात.

राग आणि असहिष्णुता हे समजूतदारपणाचे शत्रू आहेत.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही,
आपण त्याला कवटाळतो.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

खिडकी म्हणजे आकाश नसतं.
भाकरी आपल्याला जगवते
आणि
गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…

संभ्रमाच्या वेळी
नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

आपली नरकात जायची सुद्धा तयारी असली पाहिजे,
फक्त
त्याला कारण मात्र स्वर्गीय असले पाहिजे.

माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.

शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

त्यावर लक्ष्य ठेवा जे तुमच्याजवळ आहे,
जे नाही त्यावर नाही.

यशस्वी तो असतो,
जो इतरांच्या आधी स्वतःला घडवत असतो.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

यशस्वी तो होतो,
जो इतरांशी तुलना करत नाही.

गरज आणि ईच्छा यामधील फरक समजला
म्हणजे माणूस यशस्वी होतो.

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका,
कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.
माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही,
पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका,
कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

आपले ध्येय उच्च ठेवा
आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.

यश तुमच्याकडे येणार नाही,
त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,
तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.

अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे
स्वतःवरचा विश्वास…
जो मंद हास्य करत तुमच्या कानात
प्रेमाने सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून
समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस
हे गुण तिच्यात आपोआप येतात.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे,
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

मनाला उचित विचारांची सवय लागली कि
उचित कृती आपोआप घडते.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येकपटीने अधिक
देव तुम्हाला देईल.

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले 1000+ मराठी सुविचार संग्रह आपल्या नक्की उपयोगी येईल. या सुविचारांच्या माध्यमातून आपण आपले विचार अधिक समृध्द बनवाल अशी आम्हाला खात्री आहे. हे सुविचार आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारचे अजून काही सुविचार असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्यांनाही नक्कीच Add करू.

अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply